Posts

Showing posts from August, 2019

मैत्री 🤞👦👨

आकाशाहून विशाल, समुद्राहुन अथांग मायेची ओढ, असते मैत्री । पाण्याहुन ओली, वाळवंटाहून सुकी प्रेमापेक्षा प्रेमळ, असते मैत्री । पर्वताहून उंच, दरीपेक्षा खोल सगळकाही व्यापनारी, असते मैत्री । सुखात हसणारी, दुःखात हसवणारी कायम साथ देणारी, असते मैत्री । सुर्याहून प्रखर, प्रकाशाहून तेज जीवाला जीव देणारी, असते मैत्री । मैत्री म्हणजे अशी गोष्ट जिची तुलना नाही शक्य अशक्य ही शक्य करणारी, असते मैत्री ।

मैत्री

मैत्री म्हणजे काय, मैत्री म्हणजे ओळख नसताना झालेला पहिला संवाद एकमेकांवर विश्वास ठेवून आयुष्यभर केलेली वाटचाल मैत्री म्हणजे अस नातं जे सापडायला भाग्य लागतं पण एकदा गवसलं की कायमचं आपलंसं होत मैत्री म्हणजे अशी गोष्ट ज्याचं नाही कोणतं मूल्य हिच्या तुलनेत सर्वच गोष्टी ठरतात साफ अमूल्य मैत्रीच्या या नात्यात असते विश्वासाची तार काही केल्या तुटत नाही ही असते मजबुत फार मैत्री म्हणजे असं, की जिथं खुश असलेलं दाखवायला हसायची गरज नाही तसेच दुःखी आहे हे दाखवायला डोळयांत अश्रूंची गरज नाही रोज भेटायची गरज नाही, बोलायची गरज नाही एकदा जुळली की आयुष्यभर टिकते ती असते मैत्री जे कोठे मान्य नसत नाही ते इथे मान्य असतं दोस्तीच्या या दुनियेत सगळं काही fair असतं.

🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य 🇮🇳🇮🇳

                    आज 72 वर्ष पूर्ण होतायत आपल्याला स्वतंत्र होऊन. सन 1947 ला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सर्वांनी हाच विचार केला असेल की आता आपण स्वतंत्र आहोत, कुणाच्या अधिपत्याखाली नाही. आता आपण खूप प्रगती करणार, देशाला एका उंच शिखरावर नेऊन ठेवणार.पण खरंच तस होतय का ?             आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्तेक लोकांनी आपले प्राण पणाला लावले. सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशी नावे घेईल तितकी कमीच. या लोकांच्या मनात स्वतःसाठी अस काहीच नव्हतं एकच गोष्ट होती ती म्हणजे देशप्रेम. या शब्दापुढे त्यांना काहीच दुसर नव्हतं. आता आपण विचार केला पाहिजे की जसा स्वतंत्र भारताचा जसा विचार त्यांनी केला होता तसा भारत अस्तित्वात आहे का?               आताच्या पिढीत 15 ऑगस्ट च्या दिवशी घरात असणारा युवक साधा जवळपासच्या ध्वजारोहनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामध्ये रस दाखवत नाही मग या युवकांमध्ये देशप्रेमाचा अभावच असणार आहे. अब्दुल कलाम...